बेला मंडल,आदिलाबाद (गजानन खोब्रागडे ) : गोर गरीब विद्यार्थ्यांना पदवीचे शिक्षण आपल्या गावातच घेता यावे यासाठी येथे पदवी महाविदयालय (Degree College ) सुरु करावे, यासाठी एबीव्हीपीच्या वतीने गुरुवार (ता.16) रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आल्याचे विद्यार्थी कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, वाढलेल्या बस तिकीटा मुळे 12 वी पास झालेल्या गोर गरीब विद्यार्थ्यांना पदवी शिक्षणासाठी ( Degree ) बाहेरगावी जाणे परवडत नसल्यामुळे येथे वरिष्ठ महाविद्यालय (Degree College ) सूरू करावे या मागणीसाठी गुरुवार (ता.16) रोजी बेला ( मंडल ) , जिल्हा आदिलाबाद (तेलंगाणा ) येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ( ABVP ) च्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आल्याचे पत्रकार परिषदेत कार्यकर्त्यांनी सांगितले.
येथे 12 वी पर्यंत शिक्षणाची सोय आहे. पुढील पदवी शिक्षणा साठी विद्यार्थ्यांना बाहेरगावी दूर जावे लागते. अशातच बसचे तिकीट वाढल्यामुळे गोर गरीब विदार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी बसने ये-जा करणे शक्य नाही . त्यामुळे अनेक मुलं मुली पुढील शिक्षणा पासून वंचित राहात आहेत. तेव्हा या गोर गरिबांच्या मुलां - मुलींना शिक्षण घेण्यास सुलभ व्हावे यासाठी येथेच वरिष्ठ महाविद्यालय ((Degree College ) सुरु करण्यासाठी आमदार महोदयांनी पुढाकार घ्यावा. यासाठी हे एक दिवशीय धरणे आंदोलन आहे. आमची मागणी मान्य न झाल्यास भविष्याव तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ABVP चे जिल्हा SFD कन्वी नियरर श्रीवनितवार , ओम प्रकाश टॅस्टल कन्वीनर हरीश रेट्री , मनोज रेड्डी , अशोक , अक्षय आदी युवा नेत्यांनी दिला आहे.
No comments:
Post a Comment