किनवट : वीज पड्न मृत्यू पावलेल्या तीन व्यक्तिंच्या वारसाला शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या मदतीचा प्रत्येकी चार लाख रुपयाचा धनादेश आमदार भीमराव केराम व तहसिलदार उत्तम कागणे यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.
अचानक वीज पडल्याने तालुक्यातील पाटोदा (बुद्रुक) येथील आतिष संजय सोनुले, मांडवा (कि.) येथील सुभाष रामराव पेंदोर व शिवणी येथील किशन राघोजी भिसे हे आकस्मिक मरण पावले होते.
नैसर्गिक आपत्तीत वीज पडून मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या परिवाराला द्यावयाच्या मदतीच्या शासन तरतुदीनुसार प्रत्येकी चार लाख रुपयाचा धनादेश शनिवारी ( ता. १३ ) तहसील कार्यालयात आमदार भीमराव केराम व तहसिलदार उत्तम कागणे यांचे हस्ते देण्यात आला. वनवासी कल्याण आश्रमचे गोवर्धन मुंडे, अनिल तिरमनवार, घोटीचे उपसरपंच बालाजी पावडे, बालाजी आलेवार, निळकंठ कातले, मारोती भरकड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.




No comments:
Post a Comment