संकट काळात आमदार केरामांचे ते पत्र आले कामी! महिलांना जनधन तर निराधारांना पूर्ववत मानधन वाटप.... - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, May 29, 2020

संकट काळात आमदार केरामांचे ते पत्र आले कामी! महिलांना जनधन तर निराधारांना पूर्ववत मानधन वाटप....


किनवट : कोरोना आजाराच्या संकटकालीन परिस्थितीत किनवट व माहूर तालुक्यातील डोंगराळ भागातील खेडेगावातील जनधन खाते धारक महिला यांना प्रति 500 रुपये महिना तर निराधार योजने अंतर्गत लाभ मिळणाऱ्या लाभार्थ्यांना मासिक मानधन सातत्याने मिळण्यासाठी आमदार भीमराव  केरामांचे ते पत्र उपयोगी पडले असून केंद्र सरकारने तातडीने पावले उचलत राज्याच्या सचिवांना आदेशित केल्याने वरील योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याची चर्चा सध्या तालुक्यात आहे.
           सद्या जगभरात कोरोना सारख्या महाभयंकर अदृश्य शत्रूने हल्ला केलेला आहे.अशा या संकटकालीन परिस्थितीत लॉकडाऊन मुळे मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबांना मागील दोन महिन्यापासून हाताला काम नाही. घरातील होते ते सर्व धान्य संपुष्टात आल्याने कित्येक संसाराच्या चुली पेटत नाहीत. कष्ट करणाऱ्या हाताने भिक कशी मागावी या विवंचनेत अनेक स्वाभिमानी कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. याच संकट काळात अजून भर म्हणून किनवट व माहूर तालुक्यातील असंख्य महिलांची झिरो बॅलन्स असलेली जनधन खाती बंद करण्यात आली होती.त्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकासात्मक दृष्टीतून जनधन खात्यांच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील महिलांसाठी देण्यात येणारे पाचशे रुपये मासिक मदत मिळणे अशक्यप्राय होते. अशात किनवट व माहूर तालुक्याचे आमदार भीमराव केराम यांनी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्याचे मुख्य सचिव व केंद्रीय मंत्र्यांना पत्रव्यवहार केला होता. त्या पत्राची गंभीर दखल घेत मुख्य सचिवांनी बँकांना आदेशित करून झिरो बॅलन्स मुळे बंद पडलेली खाती पूर्ववत सुरू करून त्यांना पाचशे रुपये इतकी मदत देण्याचे आदेशित केले. सोबतच दोन्ही तालुक्यातील निराश्रित, निराधार,अपंग व विधवा महिलांना मिळणारे मासिक वेतन तांत्रिक कारणामुळे अडकून पडले होते. त्यात ही आता सुधारणा होऊन संपूर्ण लाभार्थ्यांना वेळेवर मासिक वेतनाचा लाभ मिळत आहे. एकंदरीत लॉकडाउनच्या संकटकाळात गोरगरीब महिला कुटुंब प्रमुख यांना शासनाकडून पूर्ववत मासिक वेतन सुरू झाल्याने आमदार भीमराव केराम यांनी केलेल्या पत्रव्यवहाराची फलनिष्पत्ती असल्याचे सांगून त्यांच्या ‘त्या’ पत्रामुळे हे शक्य झाल्याचे बोलले जात आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News