किनवट : तालुक्यातील लोणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 'बालसभा ' व ' तिरंगा झेंडा ' या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली.
गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने यांच्या आवाहनानुसार सोमवारी (ता. ८ ) ह्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता सातवी तील कुमारी तेजस्वी काळे ही अध्यक्षस्थानी होती. यावेळी कु. त्रिशा मेडलवार , काशिनाथ गुंजकर व सुरत सोळंके या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कु.श्रुती गुंजकर हिने सूत्रसंचालन केले. कु.पूर्वी धुर्वे हिने आभार मानले. मुख्याध्यापिका वर्षा कुलकर्णी, शिक्षिका शाहीन बेग, विद्या श्रीमेवार आणि राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक रमेश मुनेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली सभा संपन्न झाली.
दुसऱ्या सत्रात ' तिरंगा झेंडा ' या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
"विद्यार्थ्यांच्या मनामध्ये देशभक्तीपर मुल्यांची रुजवणूक व्हावी. सभाधीटपणा असावा. यासाठी अशा बालसभेची नितांत आवश्यकता आहे. आनंददायी शिक्षणातून मुले बोलू लिहू लागल्यामुळे शाळेत विविध प्रकारचे उपक्रम राबविल्या जाते. बालसभेतून देश आणि तिरंगा याची माहिती सांगण्यात आली.
-वर्षा कुलकर्णी, मुख्याध्यापिका
No comments:
Post a Comment