किनवट : कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमिवर केवीड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन पातळीवरून युध्दपातळीवर उपाय योजना राबवित असताना अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांप्रमाणेच ग्रामीण भागातील स्वस्त धान्य दुकानदार व तोलाई कामगारांनाही विमा संरक्षण देण्याची मागणी आमदार भीमराव केराम यांनी केली आहे.
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना दिलेल्या पत्रात किनवट माहूरचे आमदार भीमराव केराम यांनी सदरची मागणी केली असून राज्य शासनाने दि. २९ मे २०२० रोजी निर्गमित केलेले शासन निर्णयाचा हवाला देवून त्याच धर्तीवर सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जनतेच्या थेट संपर्कात असलेले ग्रामीण भागातील स्वस्त धान्य दुकानदार व सहकारी कामगार हे जनतेच्या थेट संपर्कात येत असल्याने यांचीही अत्यावश्यक सेवेत गणना करून त्यांना कोरोणा विषाणूचा प्रादुर्भाव कमी होईपर्यंतच्या कालावधीपर्यंत ५० लाखांचे विमा संरक्षण लागू करावे अशी मागणी लिखित पत्राद्वारे केली आहे.
No comments:
Post a Comment