नांदेड : धम्ममित्र सावित्रीबाई ग्यानोबा व्यवहारे यांचे आज सोमवारी (ता. १५ ) दुपारी ३ वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. त्या ६५ वर्षाच्या होत्या.
नांदेड येथील गणेशनगर कॉर्नर, सारडा कॉम्प्लेक्स, कांचनमृग अपार्टमेंट येथील त्यांच्या निवस्थानापासून त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा आज सोमवारी (ता. १५ ) रात्री ८ वाजता निघणार असून शांतीधाम गोवर्धनघाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पती, चार मुली, दोन मुलं, जावई, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. धम्मचारी पद्मामित्र व आकाशवाणीचे निवेदक तथा जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक मिलिंद व्यवहारे यांच्या त्या मातोश्री होत.




No comments:
Post a Comment