देशभक्तीची भावना निर्मिण्यास 9 ऑगस्ट क्रांती दिनी जिल्ह्यातील प्रत्येक गावात मानवी साखळी -सीईओ वर्षा ठाकूर-घुगे - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, August 7, 2022

देशभक्तीची भावना निर्मिण्यास 9 ऑगस्ट क्रांती दिनी जिल्ह्यातील प्रत्येक गावात मानवी साखळी -सीईओ वर्षा ठाकूर-घुगे

 




नांदेड ता. 7 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण करण्यासाठी 9 ऑगस्ट क्रांती दिनी नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक गावात मानवी साखळी करण्यात येणार असल्याची माहिती नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली आहे.

     मानवी साखळी मधून एकात्मतेची भावना निर्माण होईल. याप्रसंगी दिनांक 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा उपक्रमात प्रत्येक घरावर तिरंगा लावण्याचा संकल्प करण्यात येणार आहे. यासाठी गट विकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांना सदर कार्यक्रमाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

      प्रत्येक गावात मानवी साखळी मध्ये शालेय विद्यार्थी, महिला, युवक-युवती, आशा, अंगणवाडी कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, स्वंयसेवी संस्था व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी घ्यावा.

     मानवी साखळी करताना मुलांची, महिलांची व पुरुषांची स्वतंत्र मानवी साखळी तयार करावी. शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामपंचायत आदी ठिकाणी मानवी साखळीचा कार्यक्रम घेतला जाणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News