किनवट : रमाईनगर, गोकुंदा येथील ज्येष्ठ नागरिक मुक्ताबाई यादवराव पाटील ( वय ७२ वर्षे ) यांचं शनिवारी (ता.१३) दुपारी १:४५ वाजता दीर्घ आजाराने निधन झालं.
त्यांचे पती मौजे घोटी येथील मूळनिवासी तथा निवृत्त शिक्षक यादवराव चोखाजी पाटील हे नोकरीच्या निमित्त चिंचखेड येथेच स्थायिक झाले होते. तिथे मुक्ताबाई यांनी आपल्या मुला-मुलींचं शिक्षण पूर्ण करण्यावर भर दिला तसेच मुलांना व्यावसायिक बनविण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
त्यांच्या पार्थिवावर रविवारी (ता. १४ ) सकाळी १०:३० वाजता किनवट बसस्थानका जवळील शांतीभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सुना व नातवंडे असा मोठा परिवार असून नामदेव कानिंदे यांच्या त्या मोठ्या आई व जावरला येथील बातमीदार माधव शेंद्रे यांच्या त्या सासु होत.
No comments:
Post a Comment