किनवट : आर्णि येथील यशस्वी तरुण व्यावसायिक अरुण मनवर, ( वय 45 वर्षे) हे आपले साडभाऊ यांच्या भेटीसाठी येथील सिद्धार्थनगर येथे आले असता हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.
याबाबत सविस्तर वृत असे की, आर्णि येथील प्रसिद्ध पान शॉप चालक अरुण मनवर हे येथील सिद्धार्थनगर मध्ये राहणाऱ्या आपल्या दोन्ही साडभावांच्या भेटीसाठी आले होते. शुक्रवारी (ता. 06) त्यांना छातीत दुखल्याने त्यांनी पायी चालत जाऊन एका खासगी रुग्णालयत दाखविले. तेथील डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून त्यांना परत पाठविले. त्यांनतर काही तासांनी पुनःश्च त्यांच्या छातीत दुखत असल्याने त्याच रुग्णालयात त्यांना दाखल केले. परंतु त्यावेळी त्यांचे निधन झाले .
त्यांचे पश्चात पत्नी , दोन मुलीअसून त्यांच्या पार्थिवावर आर्णि जि. यवतमाळ येथे शनिवारी (ता. 07 ) सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांना दोन्हीही मुली असतांना लिंग भेदभाव न मानता त्यांनी त्यांच्या एका मुलीचा वाढ दिवस ( टाळे बंदी असतांना सुद्धा ) मोठ्या थाटामाटात साजरा केला होता. तो वाढ दिवस आर्णि परिसरात सगळ्यांच्याच स्मरणात राहणारा ठरला. असे कर्तृत्वान कार्यकर्ते हे येथील अखिल भारतीय बौद्ध उपासक संघाचे तालुकाध्यक्ष तथा निवृत प्राध्यापक रविकांत सर्पे आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते शंकर नगराळे यांचे साडभाऊ होत.
No comments:
Post a Comment