मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ झाली. त्या नंतर आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ होणार आहे. व त्या संदर्भात राज्य शासन निर्णय जारी झाला आहे. ही वाढ जुलै ते ऑक्टोबर, २०२३ या चार महिन्यांच्या भत्ता थकबाकीसह नोव्हेंबरच्या वेतनात मिळणार आहे. महागाई वाढल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात किमान एक हजार रुपये, तर अधिकाऱ्यांच्या पगारात किमान तीन हजार रुपयांपर्यंत वाढ होणार आहे.दिवाळीच्या सुट्टीत असलेल्या कर्मचाऱ्यांना या बातमीमुळे दिवाळीची आनंद द्विगुणित झाला आहे.
या पगारवाढीमुळे राज्य शासनाच्या आर्थिक तिजोरीवर २०० कोटींचा बोजा पडणार आहे. याचा लाभ सहाजिकच निवृत्तिवेतनधारकांनाही होणार आहे.
■ राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना मूळ निवृत्तिवेतनाच्या एकूण रकमेवर १ जुलैपासून चार टक्के महागाई भत्ता लागू करण्यात येणार आहे.
■ ही वाढ १ जुलै, २०२३ पासूनच्या थकबाकीसह माहे नोव्हेंबर २०२३च्या निवृत्तिवेतन व कुटुंब निवृत्तिवेतनासोबत देण्यात येणार आहे. तसेच ज्यांना निवृत्तिवेतन योजना लागू केलेली आहे, अशा मान्यता व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था, कृषी-कृषितेर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये यांमधील निवृत्तिवेतनधारक व कुटुंब निवृत्तिवेतनधारक यांनाही हा निर्णय लागू राहणार आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता १ जुलैपासून ४२ टक्क्यांवरून ४६% केला आहे.
वरीष्ठ क्रीडा शिक्षक विजय अवसरमोल सरांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. कला शिक्षक अभय ठाकरे यांनी शिंदे सरकारच्या गतीमान सरकारच्या धोरणाचे स्वागत करून लवकरच हे सरकार प्राधान्याने शिक्षक भरती करेल अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.
No comments:
Post a Comment