नांदेड : मानवी मूल्यांची लढाई लढणाऱ्या विद्वानांना भिमाकोरेगाव हिंसाचार प्रकरणी जेलमध्ये का डांबून ठेवले असा सवाल प्रा.डॉ.गौतम धुतडे यांनी केला आहे.
भिमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी श्याम निलंगेकर यांनी संकलित केलेल्या "लढाई मानवी मूल्यांची लोकशाही स्वातंत्र्याची" या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा इंदिरा विद्यालय,लालवाडी येथे करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपब्लिकन सेनाचे प्रदेशसचिव माधवदादा जमधाडे हे होते. प्रमुख पाहुणे अभियंता भरतकुमार कानिंदे, संजय वाघमारे, भीम पॅन्थरचे मराठवाडा अध्यक्ष विनोद वाघमारे, वंचितचे नेते यशवंत थोरात, रावण साम्राज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष काकासाहेब डावरे , भीम प्रहारचे जयकुमार डोईबळे यांनी या प्रसंगी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केशव थोरात, सम्यक खोसले, आनंद गजभारे, बालाजी डोईबळे यांनी परिश्रम घेतले.




No comments:
Post a Comment