किनवट :
विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ चार भिंतीच्या आतील शिक्षण महत्वाचे नसून निसर्ग,परिसर व मूल्यांचा विकास हे सुद्धा शिक्षणाचे अत्यंत महत्वाचे अंग आहे..
आपला निसर्गातील झाडे,झुडपे,पाण्याचे स्रोत याची माहिती जाणून घ्यावयाची असेल तर प्रत्यक्षात निसर्गाशी नाळ जोडावी लागते आणि याच बाबीची दाखल घेऊन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिग्रस येथील शिक्षकांनी निसर्ग शाळेचे आयोजन काही अंतरावर असलेल्या डोंगरगाव येथील तलावजवळ केले होते.
याप्रसंगी मुलांना मोकळ्या आभाळखाली बागडणे,खेळणे व मनसोक्तपणे गीत गाणे ह्या बाबीसह झाडांची नावे,त्यांचा उपयोग यांचीही माहिती देण्यात आली.
वनभोजनाचा आनंद हा जगावेगळा असतो ते प्रस्तुत शाळेतील विध्यार्थ्यांनी अनुभवला.
निसर्गशाळा उपक्रमात मुख्याध्यापक देविदास येरवाळ, शिक्षक ग.नु.जाधव,राजीव बैलके,मठदेवरू, वैशाली यलमटे आदींनी सहभाग घेतला.




No comments:
Post a Comment