राष्ट्रीय आरोग्य अभियानातीत कंत्राटी कर्मचारी न्याय मागण्यासाठी संपावर ; शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर समकक्ष रिक्त पदावर बिनशर्त समायोजन करावे ही प्रमुख मागणी - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, June 17, 2020

राष्ट्रीय आरोग्य अभियानातीत कंत्राटी कर्मचारी न्याय मागण्यासाठी संपावर ; शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर समकक्ष रिक्त पदावर बिनशर्त समायोजन करावे ही प्रमुख मागणी


किनवट : आरोग्य विभागामध्ये अधिकारी व कर्मचारी मागील १२ ते १५ वर्षापासुन कंत्राटी तत्वावर तुटपुंज्या मानधनावर काम करून आपले उदरनिर्वाह करीत आहेत तसेच समायोजनाबाबत शासनाकडे वारंवार साकडे घालत आहेत परंतु प्रत्येक वेळेस काहीतरी कारणे सांगुन आणि आश्वासने देवून त्यांच्या रास्त मागण्याकडे वारंवार शासनामार्फत व प्रशासनामार्फत दुर्लक्ष करण्यात येते . कोव्हीड-१९मध्ये जीव धोक्यात टाकून काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर समकक्ष रिक्त पदावर बिनशर्त समायोजन करावे, या व इतर न्याय्य मागण्यांसाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने पुकारलेल्या राज्यव्यापी संपात किनवट येथील एएननएम व कर्मचारी सोमवार ( ता. १५ ) पासून सहभागी  झाले आहेत.
            अर्बन एएनएम रत्नमाला एम.नाग्विडे, एसकेटीएडे, एसबीबीचॉडन व पि.एच.सी. ए.एन.एम. वंदन मेश्राम, डिंपल रोड, एस.एस. शेंडे, एस. मांधरे, एसडी. वानखेडे, तालुका समूह संघट जनार्दनची आख्या, लेखापाल प्रदीप देशमुख, डेटा एंटी ऑपरेटर प्रदीप शिंदे बी संपा का बुधवार (ता. १७) अनुभव भीमराव केराम और तालुका आरोग्य अधिकारी डा. संजय मुरमुरे याना निवेदन दिले.


                  मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनात असे नमूद केले की, आजपर्यंत कोणतीही सकारात्मक कार्यवाही आपल्या स्तरावरून करण्यात आलेती नाही , तसेच  सर्व प्रथम कंत्राटी कर्मचाऱ्यांना कोव्हीड -१९ मध्ये डयुटी लावण्यात यावी आणि नंतर नियमित कर्मचाऱ्यांच्या डयुटी लावण्यात याव्या असा तुगलकी निर्णय देण्यात आला. तरीही मृत्यूच्या दाढेत जाऊन कोव्हीड -१९ परिस्थितीत ९० टक्के कंत्राटी कर्मचारीच काम करत असल्याचे दृष्य संपुर्ण महाराष्ट्रभर दिसत आहे. असे असतांना सुष्दा मुख्यमंत्री महोदयांनी केवळ वैद्यकीय अधिकान्यांच्याच मानधनामध्ये वाढ करून आमच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट होत आहे. करीता शासनाला आमची गरज नसल्यास , आम्हालाही त्यांची गरज नसल्याचे चित्र संपुर्ण महाराष्ट्रातीत कंत्राटी कर्मचान्यांमध्ये दिसुन येत आहे. आम्ही सर्व कंत्राटी कर्मचारी उच्च शिक्षीत व प्रशिक्षीत यंत्रणा असल्यावर सुध्दा आरोग्य सेवेमधील १०००० रिक्तपदे महाभरतीद्वारे कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा न घेता अंतिम वर्षाच्या गुणांनुसार करण्यात येणार असून नव्याने येणान्या पात्रता धारकांना शासन नियुक्तीचे आदेश देणार असल्याचे आरोग्यमंत्री यांनी जाहीर करून राष्ट्रीय आरोग्य अभियानातीत कंत्राटी कर्मचारी यांच्यावर आत्मदहनाची वेळ आणली असल्यामुळे सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होवून संतापाची लाट उसळती आहे .
                   राज्य संघटनेच्या आंदोलनाची दखल अद्यापपर्यंत शासनाने घेतले नसत्यामुळे दि .१५ / ०६ / २०२० पासून शासनस्तरावरून सकारात्मक निर्णय न दिल्यास तसेच आंदोलनाची दखल न घेतला संपुर्ण महाराष्ट्रातील एन.एच.एम.कंत्राटी कर्मचारी महासंघाकडुन राज्यव्यापी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनामुळे होणाऱ्या नुकसानीस सर्वस्वी शासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी. असेही नमूद केले आहे.


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News