किनवट : येथील ज्येष्ठ नागरिक ताराबाई त्र्यंबकराव कोल्हारीकर ( वय ८० वर्षे) यांचे गुरुवारी ( ता.१०) दुपारी गोकुंदा येथील उपजिल्हा रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर पैनगंगा नदीतिरावरील कैलास मोक्षधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. येथील जिल्हा परिषद हायस्कूलचे दिवंगत मुख्याध्यापक त्र्यंबकराव कोल्हारीकर यांच्या पत्नी तर सरस्वती अध्यापक विद्यालयातील प्रा. विश्वास कोल्हारीकर यांच्या त्या मातोश्री होत.




No comments:
Post a Comment