किनवट : मराठा आरक्षणासाठी अहोरात्र झटणारे व सर्वसमावेशक लढवय्ये नेते म्हणजे दिवंगत माजी आमदार विनायकराव मेटे आपल्यातून अपघाती निधनाने निघून गेले. महाराष्ट्रासाठी ही फार मोठी हानी असून ही पोकळी कधीही भरून निघणार नसल्याचे मत किनवट येथे श्रद्धांजलीपर कार्यक्रमात आमदार भीमराव केराम यांनी व्यक्त केले.
शिवसंग्राम पक्षाचे तालुकाध्यक्ष गजानन आरमाळकर यांनी रविवारी (ता. 14) जिजामाता चौक येथे दुपारी श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित केला होता. याप्रसंगी श्रद्धांजली अर्पण करतांना ते बोलत होते.
यावेळी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, भाजपा शहराध्यक्ष श्रीनिवास नेम्माणीवार, भाजपा नेते आनिल तिरमनवार, तालुकाध्यक्ष संदीप केंद्रे, सुधाकर भोयर, जयवंत चव्हाण, बाळकृष्ण कदम, अजय कदम, शैलेश गटलेवार, सचिन कदम, अमरदीप कदम, संतोष धोंडगे, शिवा आंधळे, उत्तम जाधव, विनायक जाधव, आकाश इंगोले, अनिल कराळे, वैजनाथ करपुडे पाटील आदी मान्यवरांसह सर्व समाजातील, सर्वपक्षीय बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment