किनवट,दि.१२: बहुजन समाजातील महापुरुषांचा जाणिवपूर्वक अवमान करणारे राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटिल यांचा तात्काळ राजिनामा घेऊन त्यांच्यावर ऍट्रासिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा व समता सैनिक दलाचे मनोज गिरबडे यांच्यावर शाईफेक प्रकरणी दाखल केलेले गंभीर गुन्हे परत घ्यावेत,या मागणीसाठी आज (दि.१२) सकाळी ११वाजेच्या सुमारास शहरातील जिजामाता चौकात रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी शिव -फुले-शाहू -आंबेडकर प्रेमी युवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यासंदर्भात सर्व संबंधितांना निवेदन देण्यात आले. यावेळी 'पीरिपा,'चे जिल्हाध्यक्ष विनोद भरणे, रिपाइंचे तालुकाध्यक्ष विवेक ओंकार, सुरेश मुनेश्वर, ऍड.सम्राट सर्पे, निखिल कावळे, निवेदक कानिंदे, राजु कांबळे, निखिल सर्पे, राजू शेळके, निखिल वाघमारे, राजू नरवाडे, सुगत नगराळे, सतीश कापसे, प्रवीण गायकवाड, प्रतीक नगराळे, शुभम पाटील, संघर्ष घुले, सुधीर टाक, विकास कुडमेथे, सुगत भरणे, आनंद कावळे, अभय नगराळे यांच्यासह मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले होते.




No comments:
Post a Comment