नांदेड :
येथील श्री गुरू गोविंद सिंघजी पत्रकारिता महाविद्यालयाची विद्यार्थिनी जयश्री भागवतराव गच्चे ही एम. जे. एम. एस. या पदव्युत्तर पत्रकारिता अभ्यासक्रमात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून सर्वप्रथम आली आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा बाविसावा दीक्षांत समारंभ विद्यापीठाच्या परिसरामध्ये पार पडला. यावेळी समारंभपूर्वक जयश्री भागवतराव गच्चे हिला मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
जयश्री गच्चे ही विद्यार्थिनी पदव्युत्तर पत्रकारिता एम. जे. एम. एस. या परीक्षेमध्ये विद्यापीठातून सर्वप्रथम आल्याने पत्रमहर्षि तुंगार प्रतिष्ठान तर्फे पुरस्कृत सुवर्णपदकाचीही मानकरी ठरली. दीक्षांत समारंभाला भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबईचे संचालक प्रा. सुभाशिष चौधरी, कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्र सिंह बिसेन, विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवी एन. सरोदे आदी उपस्थित होते. याप्रसंगी दीक्षान्त समारंभानंतर श्री गुरू गोविंद सिंघजी पत्रकारिता महाविद्यालयातर्फे प्रभारी प्राचार्य विकास कदम, प्रा. संजय नरवाडे, कपील ढवळे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील परीक्षा विभागाचे उपकुलसचिव एच. एस. साबळे तर पत्रमहर्षि तुंगार प्रतिष्ठान तर्फे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या शारदा देवदत्त तुंगार यांनीही जयश्री गच्चे हिचा सत्कार केला.
No comments:
Post a Comment