किनवट : येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेतुन पैसे उचल करतांना कॅशियरच्या हातून चुकून जादा मिळालेले यांच्या चुकीने 50 हजार रूपये बँकेस परत करून दाखविलेल्या प्रामाणिक पणा बद्दल प्रा. शेषराव माने यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
प्राध्यापक शेषराव माने हे महाराष्ट्र ग्रामीण बँकेत पैसे उचल करण्यासाठी गेले. कॅशिअर कडून रक्कम स्विकारली. नंतर मोजणी केली तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की , विड्राल पर्चीवर लिहिलेल्या रकमेपेक्षा 50 हजार रुपये जादा कॅशिअर कडून त्यांच्या नजर चुकीने प्राप्त झाले. तेव्हा त्यांनी तात्काळ बँकेशी संपर्क साधुन शाखा व्यवस्थापक रूपेश दलाल यांच्याकडे 50 हजार रूपये सुपूर्द केले. यावेळी शाखा व्यवस्थापक रूपेश दलाल यांनी त्यांचा सत्कार करून आभिनंदन केले. अशी प्रमाणिकता समाजामध्ये निश्चितच आदर्श निर्माण करणारी आहे. असेही ते म्हणाले.
No comments:
Post a Comment