किनवट : येथील सिद्धार्थनगरातील जेतवन बुद्ध विहारा जवळील रहिवाशी , सामाजिक कार्यकर्ते , आंबा, केळीचे व्यापारी प्रकाश लक्ष्मणराव पाटील (वय 58 वर्षे ) यांचे शनिवारी (ता. 25 मे 2024) सकाळी 8 वाजता हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.
ते अत्यंत प्रेमळ व सुस्वभावी होते. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते म्हणून ते सर्वदूर परिचीत होते. महापुरुषांच्या जयंती अथवा इतर सार्वजनिक कार्यक्रमात ते स्वतः भोजन व्यवस्था सांभाळायचे.
त्यांचे पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा, जावई , भाऊ , नातवंडे असा मोठा परिवार असून त्यांचा प्रेतयात्रा आज शनिवारी (ता. 25 मे 2024) दुपारी 4.30 वाजता साठेनगर येथील बस आगाराजवळील (जुने राजाराम हॉटेल ) त्यांच्या निवास स्थानापासून निघणार असून किनवट-माहूर महामार्गावरील बसस्थानका जवळील शांतीभूमी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
No comments:
Post a Comment