उष्माघातामुळे किनवट तालुक्यात शेतकऱ्याचा मृत्यू - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, May 22, 2019

उष्माघातामुळे किनवट तालुक्यात शेतकऱ्याचा मृत्यू



किनवट ( संदीप दोराटे) :
किनवट तालुक्यातील नागझरी कॅम्प येथील रहिवासी शेतकरी दत्ता नामदेव भालेराव ( वय ४८ वर्षे ) यांचा बुधवारी ( २२ ) पहाटे सव्वाचार वाजता मृत्यू झाला.
             मंगळवारी (ता. २१ ) दिवसभर ऊन्हात शेतात कडबा बांधून झाल्यावर ते घरी आले. उष्पतेच्या कहरमध्ये ४४ अंश सेल्सिअस तापमान होते. तेव्हा रात्री त्यांना उलट्या झाल्या. सकाळी सव्वाचार वाजता रेल्वेने त्यांना नांदेड येथे उपचारासाठी नेण्याकरिता  किनवट रेल्वे स्थानकावर आणले होते. रेल्वे स्थानकावरच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. सायंकाळी ४ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे..

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News