यावेळी धम्म परिषदेचे अध्यक्ष किशोर भवरे, उद्घाटक पंजाब पाटील कोहळीकर, परिषदेचे संयोजक त्रिरत्नकुमार भवरे, स्वागताध्यक्ष प्राचार्य मोहन मोरे, निमंत्रक बालाजी राठोड, जोगेंद्र नरवाडे, कैलास माने, डॉ. मनोज राऊत, लक्ष्मणराव भवरे, जयभीम पाटील, निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी रामचंद्र देठे , पत्रकार एल.ए. हिरे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
अभियंता भरतकुमार कानिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागात सेवा बजावितांना लोकप्रशासन आणि समाजसेवा या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करुन समाजात नाव उज्वल केले आहे. तसेच बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इजिनिअर्स (बानाई) चे कार्यकर्ते म्हणून अनेक वंचित , उपेक्षित , श्रमिक कार्यकर्ते , कलावंत ,विद्यार्थी यांना त्यांनी स्वबळावर उभे राहण्याची प्रेरणा दिली. मोफत ग्रंथदान केले. या प्रभावी कामगिरीच्या गौरोवार्थ त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
या सन्मानाबद्दल अभि. यशवंत गच्चे, पत्रकार बाबूराव पाटील, माजी नगरसेवक मनोज गीमेकर, पत्रकार जयभीम पाटील, अनंत मुनेश्वर, अप्पाराव येरेकार, उत्तम मुनेश्वर, मिलिंद गायकवाड, सूरेश कावळे, देविदास मुनेश्वर, एस. के. पंडित, साहेबराव पुंडगे, बी. जी. पवार, प्रल्हाद मुनेश्वर,भगवान येरेकार, डॉ. कैलास कानिंदे रेणापुरकर, मनोज शिंदे, ईश्वर सावंत, भीमराव शिंगाडे, भीमराव धनजकर, एम. एम. कांबळे, वसंत वीर, अशोक गायकवाड, दिपक बनसोडे, टी. पी. वाघमारे, आर.सी.कांबळे, उत्तम कानिंदे, दयानंद तारू, मिलींद कदम, अभि. सम्राट हटकर आदींनी त्यांचे कौतुक केले आहे.
No comments:
Post a Comment